Skip to main content

मनोमनी ते याची देही


२६ तारखेला काही इ-मित्रमंडळी 'याची देही याची डोळा' भेटली त्या निमित्ताने . .    



कोण कुठले दहा बाराजण भेटण्याचा उत्साह दर्शवतात.
कोणाला ही कल्पना सहज शक्य वाटते, कुणी दुविधेत पडतात.
दुविधा अशी की जशी मी भेटण्याची तयारी दाखवली, तशी इतर सगळे दाखवतील की नाही?
दाखवलीच तर तो माणूस नक्की ती पूर्ण करेल कि नाही!
साहजिक आहे - एखादा माणूस 'जेन्युईन' झाला की तो समोरच्या व्यक्तीकडून तशीच अपेक्षा करू लागतो.

तरी काहींनी हट्ट सोडला नाही. नेट-भेट ची वाटचाल थेट-भेट च्या दिशेने अंगात आल्यासारखी सुरु केली. अश्या उत्साहाने कि भेट, ग्रेट-भेट झाली नाही तरी पर्वा नव्हती. या दांडग्या उत्साहामुळेच अखेरच्या क्षणी दोन-तीन टाळकी वाढली सुद्धा!
तशी सुरुवातीला निमंत्रण दिलेल्यांचा आकडा मोठ्ठा होता, पण का होईना त्याच्या ६० टक्के बझकर तयार झाली.

माहिती नाही जगात अशी किती लोकं पूर्वी भेटली असतील.
एक - दोन ठीके हो पण एकदम बारा?
एकदम बारा लोकांची भेट यशस्वी होण्याचे चान्सेस जेवढे होते, तेवढेच मोठ्ठा पोपट होण्याचे सुद्धा होते.
पण सगळेच जण बेधडक होते.
एकमेकाना साद घालणे सुरु झाले आणि श्रीगणेशा चरणीच भेट ठरली.

पुणे निघाले . . . .  चला जेवढे येणार होते ते आले - नाही म्हणायला तसा एक जास्तच आला.
आता ओढ लागली ती कधीही न पाहिलेल्या, पण तरीही ज्यांना 'चांगलं ओळखतो' अश्या सवंगड्याना  भेटायला.
रस्त्यावरच्या रंगवलेल्या पट्ट्यांना मागे टाकता टाकता बझ अन ब्लॉग वर पुर्वी घालवलेल्या आठवणींचे धागे विणता विणता मुंबापुरीस लवकरच पोचलो.

उत्सुकता पराकोटीस होती, ओम शांती ओम च्या गाण्यात नट नट्या एकेक करून एन्ट्री मारतात तसे प्रत्येक जण येत होते.
सगळे जमता जमता तास उलटला.
खरतर सुरुवातीला थोडंसं मळभ होतं, सगळेच थोडा विचार करत थोडा सहभाग घेत होते पण ही 'व्हर्चुअल' नाती अस्मानीच्या निळाईसारखी एकरंग व्हायला फार वेळ नाही लागला.
गेल्या दोन्-तीन महिन्यातले बझ वर घातलेले गोंधळ शब्दात येउ लागले, तशी अचानक भेटेचे रुपांतर मैफीलीत होउ लागले.

एके ठिकाणी "अरे! ही बझ वर जखमी सिंहिणीसारखी असते, प्रत्यक्षात कसली शेळी आहे!" तर दुसरीकडे "मला वाटलं हा शांत असेल पण कसला बोलतोय!" अशी वाक्ये कानावर पडू लागली.
संवेदनशील आणि भावनिक असे लिखाण करणारे एकदम खूप रांगडे आणि स्वच्छंदी वाटले. अपेक्षेप्रमाणे काही व्यक्ती अनुभवल्या ज्या त्यांच्या लिखाणाप्रमाणेच सौम्य, शांत आणि परिपक्व होत्या.
काही चटपटीत, काही कलंदर, काही लपलेले, काही बागडणारे, काही पुढारी - सगळ्या व्यक्ती आणि वल्ली जस-जश्या खुलल्या तसतशी भट्टी चांगलीच जमली. 

चौपाटीच्या किंवा कुठल्या बागेच्या भेळेचा एक गुणधर्म असतो.
आंबट, तुरट, गोड, तिखट, खारट आणि अनेक कितीतरी चवी भेळेमध्ये फक्त 'असून' उपयोग नसतो.
त्यांचे प्रमाण बरोब्बर असेल तरच भेळेला चट्पटीतपणा येतो आणि त्यामुळे मजा येते. त्यादिवशी तसंच झालं, भेळ इतकी चविष्ट जमली की जरा जास्तच मनसोक्तपणे खाल्ली.

दिवसभर सागराच्या अवतीभवती राहून त्याच्याएवढ्याच खोल पण मैत्रीच्या गहराइमध्ये अगदी दमेपर्यंत डुंबलो. पश्चिमेच्या कागदाला केशरी रंग दिसू लागला तसं मन भानावर आणून सगळीच पाखरे घरी परतण्यासाठी आपापली दिशा शोधू लागली.

काय गम्मत आहे पहा ना - आता चार दिवसांनी वाटतंय की, पुन्हा भेटू सगळे जण कधीतरी, पण त्याचवेळेस मनातली पाल पुन्हा चुकचुकती आहे,
"आता भरून गेली, तशी पाखरांची शाळा पुन्हा परत भरेल का?"        

Comments

pakhare nakki partuni shalet parat yenaar..........
Unknown said…
अरे अर्जुना खरंच वाचला तेव्हा हरवून गेलो, पण नक्की हि पाखरे पुन:पुन्हा भेटतच राहतील नक्की वाचन आहे, न बोलता सर्वांसाठी आणि हो इतका सुंदर लिहिलयस कि खरंच डोळे त्या आठवणींनी पाणावले रे.
aosomeeeeeeeee..
Nice One..
paratichya ya vatevarti asech ka he ghadate?????
Nivedita Raj said…
of course nakki bhetnar fakt date tharava :)
Unknown said…
Jyanee kament kelee te khare 'unconditional' friends ahet
dostannoo. tyabaddal kuni kahihi mhano . . mhanoon pahilyanda tumhalaa dhans!

Amar - Yenaar nakkee yenaar
Ranangan - Khoop thanks! sorry jar radawle asel tar.
Vaishali - punha swatahachech june kosh khulawat astaat mhanoon ase ghadate
Nivy - Nusti date naka tharwoo ata 'date' laa ghewoon yaa! :)
Unknown said…
अर्जुन आला नाहीस तर मग घसा ताणून रडेन भेटायचं काय आज कि उद्या कि परवा तारीख ठरावा. बस मग काय मी तर बोलतो निवी च्या गावाला जाऊ या पहिले मग नंतर लोणावळा कसं
Anonymous said…
उत्सुकता पराकोटीस होती, ओम शांती ओम च्या गाण्यात नट नट्या एकेक करून एन्ट्री मारतात तसे प्रत्येक जण येत होते. >> +1

:)

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च