Skip to main content

Posts

Showing posts from November, 2010

छोटम् वयम् गम्मतम्!

सानिकाचा आठवा वाढदिवस या रविवारी येत होता. भेटवस्तू मिळणार, लाड होणार याचा सगळा विचार करून सानिकाला काय करू आणि काय नको असं झालं होता. सानिकाची आई आता यशस्वी स्त्री असली तरी मध्यमवर्गीय घरातीलच होती. तिने ती लहान असताना केक वगैरे कापून वाढदिवस नव्हता साजरा केला, पण म्हणूनच असेल तिने सानिकाचे कमी लाड केले नव्हते. ऑफिस मधून आल्यावर जेवण बनवताना सानिकाच्या आईने सानिकाचा पापा घेतला आणि लाडातच विचारले, "एका मुलीचं काय आहे, या रविवारी!" सानिकाला पुन्हा एकदा वाढदिवसाची आठवण झाली आणि चेहरा गुलाबाच्या कळीसारखा खुलला." "ए सानिका, सांग ना काय काय करायचं आपण तुझ्या वाढदिवसाला?" - आईने लाड सुरु ठेवले. "सानिका, तुला अंगूर मलई आवडते ना, मग आपण अंगूर मलई, पुरी आणि पुलाव ठेवू, रिटर्न गिफ्ट म्हणून मुलांना छोटी छोटी झाडं देवू ." - सानिकाची आई हळूहळू सानिकापेक्षा स्वत:मध्येच रमायला लागली होती आणि रविवारचे आराखडे तयार करत होती. "तुला काय हवंय गिफ्ट म्हणून?" - शक्यतो हा प्रश्न आठ वर्षाच्या मुलांना ना विचारलेलाच बरं असतो, हे तिची आई विसरली होती, पण सानिक

महादेव काशीनाथ गोखले

प्रस्तावना प्रस्तुत लेख हा 'महाराष्ट्र टाईम्स' वर १७ नव्हेंबर रोजी इंटरनेट वर प्रसिद्ध झाला. माणसात रमणाऱ्या आणि माणसं शोधणाऱ्या सुधीर गाडगीळ यांच्या मिश्कील शैली मध्येच हे लेखन आहे.  दोघांचाही  मन:पूर्वक  मान राखून येथे संदर्भ देत आहे.गोखले आजोबांच्या मृतात्म्याला ईश्वर शांती देवो हीच माझी मनोकामना आहे. त्यांच्या कडून कळत-नकळत झालेल्या स्वास्थ्य आणि आरोग्याच्या प्रचाराबद्दल मी मूषकाच्या वाट्याची का होईना कृतज्ञता व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे. एवढ्याच प्रामाणिक उद्देशातून . . .     शाळेत असताना 'ठकठक', 'चांदोबा', भा.रा.भागवत, आणि तत्सम पाक्षिके, मासिके, साप्ताहिके इत्यादी मराठी बाल साहित्य विकत घेण्यासाठी आम्ही मुले यांच्या दुकानात जात असू. पूर्वी पेरूगेट पोलीस चौकी ते भरत नाट्य मंदिर या छोट्या रस्त्याच्या  मध्यभागी एक जुनी सागवानी लाकडाची चौकट असलेलं, शहाबादी फरशी चा ओटा वजा पार एवढी साधारण उंची असलेलं दुकान होतं. त्या  चौकटीजवळ इंग्रजी, मराठी, दैनिकांची शिस्तबद्धपणे मांडणी करून त्याच्या शेजारीच हे आजोबा  जमिनीवरच बसलेले दिसत. गोष्टीतले आजोबा असतात तसे मात

गोरखगड (गोरक्षगड) Gorakhgad

पुढील वृत्तांत हा माझा ज्येष्ट मित्र (खरतर फक्त या ट्रेक पुरताच) केदार परांजपे याच्या लेखणीतून (का कीबोर्ड तून?) आला आहे. त्याने तो त्यावेळीच पाठवला होता. काही वर्षांपूर्वी (अंदाजे चार सव्वा चार) पूर्ण केलेला हा ट्रेक मनाच्या कोपऱ्यात आहे. काही दिवसांपूर्वी एका मित्राला या गडाची माहिती हवी होती तेव्हा जीमेल सर्च केले. प्रस्तुत लेखात केदारची ओरिजिनल लिपी, काही छोटे मोठे बदल आणि काही छोट्या गोष्टी वाढवल्याची गुस्ताखी केली आहे.   जायचे कसे: स्वत:चे वाहन असेल तर उत्तमच. नाहीतर, पुण्याहून मुंबईकडे जाणारी कुठलीही  ट्रेन पकडावी. बोर-घाट पार करत कर्जत येथे उतरावे. कर्जतहून  मुरबाड-कडे जाणारी बस (किंवा खाजगी वाहन) करावी. कर्जतहून शेवटची बस संध्याकाळी ६.०० वाजता आहे.कर्जतपासून ४५ की.मी. वर म्हसा हे गाव लागते, तेथे उतरावे. उजवीकडे देहरी  या  गावाकडे एक रस्ता फुटतो. म्हसा येथून देहरी १२ की.मी.  आहे. खाजगी जीप गाड्या सहज उपलब्ध असतात ( रु. ८/- प्रती सीट). देहरी येथे तुम्ही थेट गोरखगडाच्या पायथ्याशी पोचू शकता.+ वृत्तांत: आधी ठरल्याप्रमाणे सर्व मंडळी (GS, केदार, गिरी, मिहीर आणि अर्जुन)ठीक सहा च्

HE

Quote - 'He doesn't need a visa to travel abroad, he just jumps from the tallest building in Chennai and holds himself in the air while the earth rotates.- source unknown' He needs no introduction. He grew up as the youngest out of four siblings in Bangalore , Karnataka. His family originates from Jejuri, Pune Distrct. In his teens he worked as 'coolie' and later on worked as bus conductor in Karnataka State Transport Services. His friend Raj Bahadur encouraged him to get trained in acting. At that time his friend financially supported him for more than 2-3 years. During his initial career, he mostly portrayed villainous roles. S. Muthuraman who he refers as his teacher and mentor, finally changed his image from ‘bad man’ to ‘hero’. Later they both worked together in more than 20 films. His acting career got a big boost during the period of late seventies and early eighties. Moreover, in late eighties he had decided to bid adieu to his acting career, until movie ‘

:-(

Yesterday I was assessing this question – what is the important difference between childhood & adulthood? Most adult people evaluate their mistakes & messes of the past. They try to be a behavioral critic for themselves. Some folks get so used to their mistakes that after some time they forget about it and only think about their achievements (in case if they have any). Some adamant people know that they behaved incorrectly in some situations of the past, but they just can’t set off their ego. Sadly, I couldn’t extract any of such traits out of child’s psychology. Child psycology is universal. It is uncomplicated.   I therefore concluded that. . . .  Childhood is at times getting wrong and being genuinely sorry or terrified or both for that mistake.   On the other hand adulthood is believing that, it's everyone’s right to sometimes be wrong. P.S. - To know more follow the discussion on this topic in comment section.  

मी किल्लेदार!

माझ्या एका पुतण्याने मला किल्ला बनवायला बोलावले होते, किल्ला बनवताना त्याला त्या किल्ल्यात गुहा हवी(च) होती. खरं तर मी सुद्धा तेवढा होतो तेव्हा किल्ला करताना एकवेळ 'त्यात माणसं दिसली नाहीत तरी चालेल पण त्यात 'गुहा' पाहिजेच',  ही  स्वत:ची मागणी मी केंद्रस्थानी ठेवून किल्ला करायचो. (फक्त मागणी केंद्रस्थानी ठेवायचो, गुहा नव्हे! -  वाईट होता. असो .) हे किल्ला करायचं खूळ दिवाळी च्या १-२ दिवस आधी डोक्यात यायचं आणि पहिला प्रश्न असायचा 'जागा'! स्वतःच्याच वयाची ३-४ टाळकी बरोबर असायची आणि आईचेही तिच्या लाडू, करंजी, चकली, चिवडा यांच्या व्यापातून थोडे फार लक्ष असायचे की ही पोरे किल्ल्या साठी कुठली भिंत खराब करणार. खरतर 'दिवाळी' हीच मुळी आम्हा सगळ्याच पोरांना स्वप्नवत पळवाट असायची. दिवाळी म्हणलं की नो धपाटे, नो राग आणि नो आरडाओरडा  हे आई बाबांचे 'अलिखित' ठरलेले आहे हे आम्हाला जाणवायचं. उठता लाथ बसता बुक्की याची वर्षभर सवय असायचीच त्यामुळे त्यावेळेस   पालकांपैकीच कुणी शिस्त लावायच्या मूड मध्ये आला की आई- बाबां किंवा आज्जी-आजोबांनी 'अगं किंवा अहो आज सण आहे