Skip to main content

छोटम् वयम् गम्मतम्!


सानिकाचा आठवा वाढदिवस या रविवारी येत होता. भेटवस्तू मिळणार, लाड होणार याचा सगळा विचार करून सानिकाला काय करू आणि काय नको असं झालं होता. सानिकाची आई आता यशस्वी स्त्री असली तरी मध्यमवर्गीय घरातीलच होती. तिने ती लहान असताना केक वगैरे कापून वाढदिवस नव्हता साजरा केला, पण म्हणूनच असेल तिने सानिकाचे कमी लाड केले नव्हते.
ऑफिस मधून आल्यावर जेवण बनवताना सानिकाच्या आईने सानिकाचा पापा घेतला आणि लाडातच विचारले,
"एका मुलीचं काय आहे, या रविवारी!" सानिकाला पुन्हा एकदा वाढदिवसाची आठवण झाली आणि चेहरा गुलाबाच्या कळीसारखा खुलला."
"ए सानिका, सांग ना काय काय करायचं आपण तुझ्या वाढदिवसाला?" - आईने लाड सुरु ठेवले.
"सानिका, तुला अंगूर मलई आवडते ना, मग आपण अंगूर मलई, पुरी आणि पुलाव ठेवू,

रिटर्न गिफ्ट म्हणून मुलांना छोटी छोटी झाडं देवू." - सानिकाची आई हळूहळू सानिकापेक्षा स्वत:मध्येच रमायला लागली होती आणि रविवारचे आराखडे तयार करत होती.
"तुला काय हवंय गिफ्ट म्हणून?" - शक्यतो हा प्रश्न आठ वर्षाच्या मुलांना ना विचारलेलाच बरं असतो, हे तिची आई विसरली होती, पण सानिका सुद्धा एवढा विचार करतीये पाहून तिचाही कुतूहल ताणल गेलं. लगेचच तिने स्वयंपाकाची तयारीही सुरु करायला घेतली.
सानिकानी मिनिटभर विचार करून काहीतरी आठवल्या सारखा चेहरा केला, आणि पळत पळत हाक मारली "आsssssई!"
"काय ग शोना?" - आईनेही सानिकाला लाडातल्या नावानी हाक मारली. आज माय लेकीचे प्रेम भलतेच उतू चालले होते.
"मला आठवलं, मला काय गिफ्ट हवंय ते!" - सानिका
"काय हवंय तुला?" - आईने कुतूहलाने विचारले.
"बिग बॉस मध्ये त्या पॅमेला ताईनी जशी चादर घातली होती, तश्या २-३ चादरी दे ना मला वाढदिवसाला."
इतका वेळ कौतुकानी पाहत असलेली सानिकाची आई हादरलीच! आपल्या कार्टीला, चादर घालून पॅमेला अंडरसन बनून धक धक करायचंय याचा विचार करून तिला जरा गरगरलंच आणि तिचा चेहरा सरस्वतीमाते पासून कालीमातेसारखा अवघ्या चार सेकंदात झाला.
धप्पदिशी एका धपाट्याचा आवाज आला आणि त्या मागोमाग सानिकाच्या भोकाडाचाही.

Comments

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च