Skip to main content

श्रद्धांजली

सांस्कृतिक शहर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी बिरुदे मिरवणारे आपलं पुणं आज पोरकं झालं. पुण्याला खूप वरच्या आणि आदराच्या स्थानाला पोहोचवणारा कला क्षेत्रातील 'वडील' माणूस आज अनंतात विलीन झाला.

स्वत:चे सबंध आयुष्य या तानसेनाने संगीत साधनेसाठी अर्पण केले. अश्या शिष्याकडे पाहून विनायकबुवा, भक्त मल्होत्रा, सवाईगंधर्व यांसारखे गुरुजन स्वर्गामध्ये किती भरून पावले असतील!

असा शिष्य, असा नेता, असा कौसी कानडा, असा तेजस्वी आकार, असा मेघ मल्हार, अशी संगीताची मांडणी, त्यांच्या स्वरसादामार्फत श्रोत्याना मिळणारी - 'ईश्वर आहे आणि तो समोर गातो आहे' अशी मिळणारी दैवी अनुभूती, असे अजरामर तुकोबाचे अभंग त्यातले तुकोबांचे भाव पुन्हा ऐकणे, अनुभवणे पुन्हा कधीच न होणे.

पंडितजींचे गायन खूप जवळून 'अनुभवता' आले, त्यांच्या काळात मी झालो याबद्दल ईश्वरचरणी नतमस्तक होतो. त्यांनी एवढ सगळं दिलं, ऐकवलं, संगीत प्रसारकाची महोत्सवाची परंपरा सुरु केली या बद्दल मी त्यांचा शतश: ऋणी राहीन. त्याबद्दलची कृतज्ञता मी कशी व्यक्त करावी हे माझ्या आकलन शक्तीच्या बाहेर आहे.

या स्वरभास्करास, या 'बाप' माणसास ओलसर पापण्यांनी, शहारलेल्या अंगाने, खूप खोलवर रुतलेल्या हृदयाने आणि अडकलेल्या श्वासाने त्यांच्याच भावपूर्ण भैरवीने श्रद्धांजली वाहतो!




जो भजे 'सूर' को सदा|
सो ही परम पद पावेगा|

     

Comments

Anonymous said…
thanks buddy.... majya pan same bhavana shabda madhe mandalya badal..
Unknown said…
पंडित भीमसेन जोशी व्यक्तिमत्व मोठ्ठ त्यांचे असे जाणे खूप दुख:द आहे मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
Tatyaa.. said…
मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली..!

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च