Skip to main content

- देवबाप्पाकडे प्रार्थना -

५१ वे शतक पाहून अखेरीस केवळ दैवी अश्या प्रखर तेजापुढे मस्तक नेहमीसारखेच  आपोआप झुकले. १९८९ पासून किती नास्तिक लोकांना या अवताराने आस्तिक बनवले आहे - देव (तोच) जाणे!


सचिन हा विषय ब्लॉगसाठी घेणे मी कायमच टाळतो, पण आज हे वरील वाक्य लिहिताना मोह आवरला नाही, आणि हे छोटेसे साकडे एकदम संगणकाच्या पडद्यावर अवतरले.   


देवबाप्पा,


ओम सच्चीदानंदाय नम:!

माझ्या बालपणात ते तरुणपणापर्यंत तुम्ही क्रिकेट जगतात अवतरलात याबद्दल मी कृतज्ञता तुमच्याकडे कशी व्यक्त करू कळतच नाही.  एवढे मात्र आहे कि जर तुम्ही प्रसन्न झालात आणि समोर प्रकटलात तर तुम्हाला मी कडकडून मिठी मात्र नक्कीच मारणार आहे.


तुमची शतके बघता बघता उपभोगाच्या नशेत अडकलेला मी, तुम्हाकडे फक्त एवढीच अजून मागणी करतो कि आता शतकांच्या शतकपूर्ततेसाठी उरलेली तीन शतकेही लवकर पूर्ण होऊन्देत. विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतकांचा हा होऊ घातलेला हिरकमहोत्सव पूर्ण करा असंच साकडं मी पूर्ण भक्तिभावनेने तुम्हाकडेच  घालतो. 


विश्वकरंडक उंचावणारा धोनी तसेच धावांच्या आणि विक्रमांच्या अत्युच्च शिखरावर विराजमान झालेले  विक्रमादित्य असे साक्षात तुम्ही हा देखावा बघून  माझ्यासारख्याच य:कश्चित १०० कोटी जनतेला मोक्ष मिळाल्याचा आनंद होईल याची तुम्हालाही कल्पना आहेच. शेवटी काय आहे सांप्रत जगात भरडले जाणारे आम्ही सर्व;  अश्याच चांगल्या क्षणांच्या अनुभवाच्या इंधनावर जगत आलो आहोत.    

तुमच्यापुढे अजून जास्त बोलण्याची गुस्ताखी मी करत नाही, तेवढी खरतर कोणाचीच पात्रता नाही. त्यामुळे मी इथेच मन: आणि भक्तीपूर्वक माझे बोलणे थांबवतो.



ओम सच्चीदानंदाय नम:!




तुमचा परम भक्त, शिष्य, साधक आणि त्यामुळे सचिन-संप्रदाय-अनुगामी,
अर्जुन व. देशपांडे  

Comments

wah farach chhan..... || Om Sachinayan Mah: ||
Unknown said…
वाह!!!!!!!!!!! वाह!!!!!!!!!!! वाह!!!!!!!!!!! वाह!!!!!!!!!!! खूप सुंदर आहे.


शेवटी अर्जुनाच्या शब्दांचा बाण हो
Unknown said…
dhnyawaad indradhanu. blog war welcome ranaangan.
Unknown said…
wah wah... farach chaan :)
ओम सच्चीदानंदाय नम:! :):):):)
VIjay Kudal said…
asach lihit raha

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च