Skip to main content

नशीब

फुटके नशीब किंवा कपाळ करंटेपणा हा वैयक्तिक नसतो - तसा जागतिकच असतो. कालच एका वन वे बोळातून मोटारीतून जात असताना अचानक समोर बस आली - पर्याय नसल्याने मला पुढची मार्गक्रमणा बस मागून करावी लागणार होती. पुढचा दहा  मिनिटांचा  प्रवास  हा आता बस मागोमाग करावा लागणार, शिवाय बस थांब्यावर दर दोन मिनिटांनी बस बरोबर वाट पाहत थांबावे लागणार या कल्पनेने मी म्हणालो, "काय फुटकं नशीब आहे - आपल्याच बाबतीत असे कायम घडते!"


फुटकं  नशीब असा म्हंटल्याबरोबर गौतम बुद्धाची नशिबाची व्याख्या आठवली. तो म्हणाला होता - सखोल ज्ञान आणि  तशीच  कुशलता असणे, शिवाय सुशिक्षित असूनही चांगली भाषा असणे म्हणजे नशीब.  आता ही व्याख्या बसच्या मागून निर्विकारपणे गाडी चालवताना कुठे लागू होते हे माझ्या कळण्याच्या बाहेर होते.


यथावकाश जिथे - ज्या कार्यक्रमला पोचलो, तिथे एक हल्लीच पुण्यात शिफ्ट झालेला मित्र भेटला, तो त्याच रस्त्यांनी आला होता. त्याच निमुळत्या रस्त्यावर माझ्यासारखीच त्याच्या मोटारीपुढेही  अचानक बस आली होती आणि शिवाय मागेही; भरीस भर म्हणून त्या गल्लीत एक मोटारसायकलवाला त्याच्या शेजारून गाडी चालवत गिचमिड वाढवत होता. इतक्या सगळीकडे बघत बघत जात असल्यामुळे पुण्यामध्ये नवीन असलेला तो रस्ता मात्र चुकला नाही आणि व्यवस्थित वेळेत कार्यक्रमाला हजर झाला.


मनातल्या मनात बुद्धा सारखीच नशिबाची व्याख्या माझ्यापरीने मी लगेच तयार केली - नशीब म्हणजे रस्त्यावरून हळू हळू जाणे, कारण रस्ता चुकायचे भय तुम्हाला त्यामुळे राहत नाही. :)

हल्लीचे जग, प्रत्येकाचे आयुष्य इतके स्पर्धात्मक झाले आहे नं, कि प्रत्येकजण नुसता पळत असतो. बऱ्याचदा मार्गात अडथळे येतातच, आणि असे कि त्यांच्यापुढे कुणीच काही करू शकत नाही.  तुम्हाला  बळेच  सावकाश  जावे लागते. आयुष्यात अश्या सावकाश जाण्याने जरी तुम्ही स्वत:ला कमनशिबी म्हणवून घेतले तरी त्यामुळे तुमच्या हातून चुका होण्याची शक्यता खूपच कमी असणार आहे हा फायदाही होतो.      


आयुष्याच्या बाबतीत हे किती समर्पक आहे  याचा असा विचार झाल्याने स्वतःची हि कल्पना स्वतःलाच  आवडली. अश्याच कुठल्या ना कुठल्या विचारात परतीचा रस्ताही धरला.

Comments

चला.. पुण्यातले ट्राफिक ने १ तरी चांगले काम केले म्हणायचे.. असेच तुम्हाला उत्तरोत्तर बुद्ध्संदेश प्रचीतीस येत जावोत हि सदिच्छा !!!!! ;) ;)

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च