Skip to main content

मुन्नी कि शीला?

दबंग आला, चालला आणि गेला. आता तीस मार खान येत आहे. कदाचित तोही चालेल आणि जाईल, पण दोन्ही चित्रपटांना जोडणारा एक दुवा आहे. तो म्हणजे त्यातील आयटेम सॉंग! कदाचित या दोन्ही गाण्यांची प्रदर्शन होण्याची तारीख इतकी एका पाठोपाठ होती त्यामुळेच लोक त्यांची तुलना करू लागले असतील. हा प्रश्न कुठून आला माहित नाही, पण बर्याचदा  मुन्नी श्रेष्ट कि आता येउ घातलेली शीला श्रेष्ठ याची लाळ गाळत लोक  चर्चा लुटतात. (माझ्या मते फारा खान चा हा स्टंट असू शकेल कारण दोन्ही गाणी तिनीच नृत्यदिग्दर्शित केली आहेत.) 


माझ्यासाठी हा प्रश्नच अवैध आहे म्हणा. खरतर दोन्हीची तुलना होऊच शकत नाही कारण मुन्नी ला त्याच्या  सेट मुळे, त्याच्या मधलं 'डार-लिंग' या शब्दामुळे आणि नाचाच्या स्टेप्स मुळे त्याला अगदी देशी फील आहे, तर शीला म्हणजे पूर्णपणे अमेरीकानाईस्ड आहे, त्यातले अर्धे शब्द पहिल्यांदा ऐकताना कळतही नाहीत, नाच लक्षातही राहत नाही.


मुन्नीचे सामर्थ्य म्हणजे मलाईका काकू, शिवाय गाण्याच्या अर्ध्या भागात सलमानचा धुमाकूळ, लोकांना कळेल अशी भाषा, लोकांना नाचता येईल असा नाच.

दुसऱ्या  या बाजूला शीलाचे एकमेव सामर्थ्य म्हणजे कत्रिना कैफ. मधल्या काळात सॉलिड मेहनत करून ती चांगलीच बारीक झालेली आहे हे 'स्पष्ट' पणे दिसते. :) एखादीने आपल्या  कल्पनाशक्तीच्या  पलीकडे किती परफेक्ट दिसावं याचं 'सुरेख - सुंदर' उदाहरण म्हणजे साक्षात ती. नेहमी  पेक्षा  वेगळी  एनर्जी  तिने शीला मध्ये दाखवली आहे हे जाणवतच आणि त्यामुळेच  ते  गाणं  एकदम  भावत.  पण एकंदरीत संगीत वगैरे गोष्टी पाहिल्या तर शीला भारतीय जनतेला किती पचनी पडेल याची शंकाच आहे.


विषयाची सुरुवात विषय डीबेटेबल नाही असं म्हणून केली याची जाणीव आहे, तरी  मलाईका आणि कतरिना (आणि झालाच तर फारा) यांचा मान राखून जर मी मुन्नीलाच निवडणार हे (तुम्हा हुशार वाचकाना!) समजलेच असेल.  त्याचवेळेस एवढाही महत्वाचा मुद्दा मी नमूद  करतो कि याच वेळेस टीव्ही वर नाचत असणारी लूज टाय घातलेली  न्यूयोर्क मधली 'शीला' ही मी नजरेतून सोडू शकणार नाही हेही आहेच. :)              

Comments

sanjay bhonge said…
tumache assessment agadi barobar aahe.
Unknown said…
धन्यवाद . . . संजयजी!

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च