Skip to main content

विदर्भातली भाषा

विदर्भातली भाषा हा मराठीच्या अभ्यासकांचे चर्चा करण्याचा आवडता विषय. पुलंनी पुणेकर, मुंबईकर कि नागपूरकर यातून त्या भाषेचे ठराविक शब्द, हेल ये लोकांपर्यंत पोहोचवून ठेवले. वाढत्या शहरीकरणामुळे आता बरेच लोक इकडे येऊ लागले आहेत. आधीच्या नौकरी दरम्यान माझाही बरयाच नाग्पुराकारांशी संपर्कही आला.

"काय करून राहिला बे?",
"तू थांब, मी येउन राहिलो आहे तिकडे."
"अरे तो कागद घेवून घे"
"एवढा मजा आला ना, बास रे बास! "

हि आणि अश्या प्रकारची काही वाक्ये कायमच कानावर येत असत. गप्पांच्या ओघात, मित्राने निष्कर्ष काढला की नागपूर महाराष्ट्राच्या एका बाजूला आहे, त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारचा मध्य प्रदेशाच्या हिंदीचाही संस्कार आहे. हिंदीचा प्रभाव तिकडच्या मराठीवर एवढा वाढला असेल की -  थोडे मराठी शब्द वापरून आणि वाक्य रचना हिंदी सारखीच करून नागपुरी मराठी विकसित झाली असेल.

 नागपूरच्या मराठीवर या अश्या हिंदीच्या साच्याचे संस्कार झाले असतील. मग ऐकलेले शब्द, वाक्य जुळवून या थेअरी मध्ये बसताहेत की नाही हे पडताळून पाहिले. बघा ना -

"काय करून राहिला बे?",
क्या कर रहा है?

तू थांब, मी येउन राहिलो आहे तिकडे."
तू रुक, मी आ रहा हू वहां.

"अरे, तो कागद घेवून घे"
 "अरे वो कागज ले ले."

"एवढा मजा आला ना, बास रे बास!
- मजा मधला जा इकडे जाळातला जा, जसा हिंदीत म्हणतात. उरलेले सगळे शब्द हे हिंदीतही आहेत.

आता नवीन विदर्भातल्या मराठीशी काहीच संबंध येत नाही, पण कुठूनतरी आलाच तर त्यांचे शब्द, वाक्य रचना हि हिंदी भाषेशी पडताळून पाहण्याचा छंदच लागला आहे. :)

Comments

Vidarbh Madhya pradeshachya javal ahe mhanun asel..

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च