Skip to main content

भगवद्गीता रहस्य


काही दिवसांपूर्वी गीतारहस्य चे अवलोकन वाचत होतो .... अचानक का कुणास ठाउक एक गोष्ट जाणवली.

सर्वसामान्य माणसाला विष्णूच्या दशावतारांपैकी रामाच्या अवताराचे अनुकरण करणे म्हणजेच - मर्यादा पुरुषोत्तम, संयमी, एक पत्नीव्रत, दुरितांचा नाश, कुटुंबवत्सल वगैरे गुण अवलंबणे हे जरूर शक्य आहे आणि म्हणाला तर सोपेही आहे.

पण अशीच बुद्धी कुणाला कृष्णाचे अनुकरण करायची झाली तर
तर ते अनुकरण 'आदर्शवादी' म्हणून accept होईल का हा प्रश्न पडला. निष्कर्ष एवढाच काढला आहे की . . कृष्णा सारखे कुणी वागायला लागले तर त्या व्यक्तीला आजचा white collar समाज आदर्श नक्कीच मानणार नाही पण लोकांच्या हातचा मार जरूर खाईल

भगवद्गीता
भगवान श्रीकृष्णा प्रमाणेच अगम्य आहे . . . त्यामुळे त्यावर लाखो टीका लिहिल्या गेल्या, अजूनही नव-नवीन लेख छापले जात आहेत. थोडक्यात bluntly सांगायचं तर mostly स्वत:ची विद्वत्ता सिद्ध करण्यासाठी म्हणून दुर्दैवाने गीतेचा आधार घेतला गेला . याच कारण, त्या प्रत्येकानी ज्याच्या त्याच्या सोयीनी त्यातून घेतलं आहे आणि आपापल्या पद्धतीने सोयीस्कररीत्या अर्थ काढलेला आहे.
No doubt - राजकारणी भगवद्गीतेला एवढे महत्व देतात. 

Comments

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद ...

मनोमनी ते याची देही

२६ तारखेला काही इ-मित्रमंडळी 'याची देही याची डोळा' भेटली त्या निमित्ताने . .      कोण कुठले दहा बाराजण भेटण्याचा उत्साह दर्शवतात. कोणाला ही कल्पना सहज शक्य वाटते, कुणी दुविधेत पडतात. दुविधा अशी की जशी मी भेटण्याची तयारी दाखवली, तशी इतर सगळे दाखवतील की नाही? दाखवलीच तर तो माणूस नक्की ती पूर्ण करेल कि नाही! साहजिक आहे - एखादा माणूस 'जेन्युईन' झाला की तो समोरच्या व्यक्तीकडून तशीच अपेक्षा करू लागतो. तरी काहींनी हट्ट सोडला नाही. नेट-भेट ची वाटचाल थेट-भेट च्या दिशेने अंगात आल्यासारखी सुरु केली. अश्या उत्साहाने कि भेट, ग्रेट-भेट झाली नाही तरी पर्वा नव्हती. या दांडग्या उत्साहामुळेच अखेरच्या क्षणी दोन-तीन टाळकी वाढली सुद्धा! तशी सुरुवातीला निमंत्रण दिलेल्यांचा आकडा मोठ्ठा होता, पण का होईना त्याच्या ६० टक्के बझकर तयार झाली. माहिती नाही जगात अशी किती...