Skip to main content

श्रद्धांजली

सांस्कृतिक शहर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी बिरुदे मिरवणारे आपलं पुणं आज पोरकं झालं. पुण्याला खूप वरच्या आणि आदराच्या स्थानाला पोहोचवणारा कला क्षेत्रातील 'वडील' माणूस आज अनंतात विलीन झाला.

स्वत:चे सबंध आयुष्य या तानसेनाने संगीत साधनेसाठी अर्पण केले. अश्या शिष्याकडे पाहून विनायकबुवा, भक्त मल्होत्रा, सवाईगंधर्व यांसारखे गुरुजन स्वर्गामध्ये किती भरून पावले असतील!

असा शिष्य, असा नेता, असा कौसी कानडा, असा तेजस्वी आकार, असा मेघ मल्हार, अशी संगीताची मांडणी, त्यांच्या स्वरसादामार्फत श्रोत्याना मिळणारी - 'ईश्वर आहे आणि तो समोर गातो आहे' अशी मिळणारी दैवी अनुभूती, असे अजरामर तुकोबाचे अभंग त्यातले तुकोबांचे भाव पुन्हा ऐकणे, अनुभवणे पुन्हा कधीच न होणे.

पंडितजींचे गायन खूप जवळून 'अनुभवता' आले, त्यांच्या काळात मी झालो याबद्दल ईश्वरचरणी नतमस्तक होतो. त्यांनी एवढ सगळं दिलं, ऐकवलं, संगीत प्रसारकाची महोत्सवाची परंपरा सुरु केली या बद्दल मी त्यांचा शतश: ऋणी राहीन. त्याबद्दलची कृतज्ञता मी कशी व्यक्त करावी हे माझ्या आकलन शक्तीच्या बाहेर आहे.

या स्वरभास्करास, या 'बाप' माणसास ओलसर पापण्यांनी, शहारलेल्या अंगाने, खूप खोलवर रुतलेल्या हृदयाने आणि अडकलेल्या श्वासाने त्यांच्याच भावपूर्ण भैरवीने श्रद्धांजली वाहतो!




जो भजे 'सूर' को सदा|
सो ही परम पद पावेगा|

     

Comments

Anonymous said…
thanks buddy.... majya pan same bhavana shabda madhe mandalya badal..
Unknown said…
पंडित भीमसेन जोशी व्यक्तिमत्व मोठ्ठ त्यांचे असे जाणे खूप दुख:द आहे मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
Tatyaa.. said…
मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली..!

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च...

बालगंधर्व

  नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल. नितिन देसाईक्रुत ’ बालगंधर्व ’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्व ांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो. त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगं धर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्व ांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जाग...