Skip to main content

विदर्भातली भाषा

विदर्भातली भाषा हा मराठीच्या अभ्यासकांचे चर्चा करण्याचा आवडता विषय. पुलंनी पुणेकर, मुंबईकर कि नागपूरकर यातून त्या भाषेचे ठराविक शब्द, हेल ये लोकांपर्यंत पोहोचवून ठेवले. वाढत्या शहरीकरणामुळे आता बरेच लोक इकडे येऊ लागले आहेत. आधीच्या नौकरी दरम्यान माझाही बरयाच नाग्पुराकारांशी संपर्कही आला.

"काय करून राहिला बे?",
"तू थांब, मी येउन राहिलो आहे तिकडे."
"अरे तो कागद घेवून घे"
"एवढा मजा आला ना, बास रे बास! "

हि आणि अश्या प्रकारची काही वाक्ये कायमच कानावर येत असत. गप्पांच्या ओघात, मित्राने निष्कर्ष काढला की नागपूर महाराष्ट्राच्या एका बाजूला आहे, त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारचा मध्य प्रदेशाच्या हिंदीचाही संस्कार आहे. हिंदीचा प्रभाव तिकडच्या मराठीवर एवढा वाढला असेल की -  थोडे मराठी शब्द वापरून आणि वाक्य रचना हिंदी सारखीच करून नागपुरी मराठी विकसित झाली असेल.

 नागपूरच्या मराठीवर या अश्या हिंदीच्या साच्याचे संस्कार झाले असतील. मग ऐकलेले शब्द, वाक्य जुळवून या थेअरी मध्ये बसताहेत की नाही हे पडताळून पाहिले. बघा ना -

"काय करून राहिला बे?",
क्या कर रहा है?

तू थांब, मी येउन राहिलो आहे तिकडे."
तू रुक, मी आ रहा हू वहां.

"अरे, तो कागद घेवून घे"
 "अरे वो कागज ले ले."

"एवढा मजा आला ना, बास रे बास!
- मजा मधला जा इकडे जाळातला जा, जसा हिंदीत म्हणतात. उरलेले सगळे शब्द हे हिंदीतही आहेत.

आता नवीन विदर्भातल्या मराठीशी काहीच संबंध येत नाही, पण कुठूनतरी आलाच तर त्यांचे शब्द, वाक्य रचना हि हिंदी भाषेशी पडताळून पाहण्याचा छंदच लागला आहे. :)

Comments

Vidarbh Madhya pradeshachya javal ahe mhanun asel..

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च...

बालगंधर्व

  नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल. नितिन देसाईक्रुत ’ बालगंधर्व ’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्व ांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो. त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगं धर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्व ांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जाग...