Skip to main content

समाधानी जिणं



'कलोजस' नावाच्या एका कथेवरून प्रेरणा घेवून - -  

तीच ती घामट्ट हवा - कोण खोकतोय - माणसांच्या गर्दीने निर्माण झालेली एक प्रकारची ती उष्णता - गर्दीतच मध्यभागी नदीसारखा वाहणारा माणसांचा प्रवाह - त्या प्रवाहातून वाहत चाललेली माणसे -  तो ही त्या प्रवाहातून वाहत जाउ लागतो.

मनात विचार असतात. कायम वाकड्या चालणाऱ्या आणि तिरकट बोलणारया क्लायंटला कसं सांभाळून घ्यावं. हाफिसात पोचल्या पोचल्या पहिला चहाचा कप हाती लागतो. दिवसभर बॉस ची कटकट सहन करून घेताना, डोकं फिरलेल्या क्लायंट बरोबरच्या आणि काहीतरी मार्ग काढून केलेल्या चर्च्या कधी थांबतात कधी अडतात तर कधी फिस्कटतात. टिफिन मधली थंडगार झालेली भाजी पोळी खाउन जीव पुन्हा घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा इच्छा - निरीच्छेच्या गोत्यात न अडकता जुंपून जातो. संगणकावरची  खरडपट्टी, कलीग्जशी झालेले समज - गैरसमज पचवून घेता घेता तो दिवसाभरात किती तरी चहा जिरवतो. संध्याकाळ पर्यंत त्याचा जीव उबगलेला असतो. पुन्हा तोच प्रवास पुन्हा ती बसची गर्दी, पुन्हा लोकलच्या फलाटावरचा हैदोस, जीव कितीही घुटलेला असला तरी ति घुसमट तो सहन करायचा.  इतर सगळयांसारखीच सवयच झाली होती म्हणा ना!  तास दीड तासाच्या या रेटारेटीतून पुरता जीव पिरगळून गेला होता.

त्याच्या मनात दाबून टाकलेले विचार ज्वालामुखी सारखे वर येतात. कुठलं दुष्टचक्र आहे हे! 'मी' कुठे शिल्लक राहिलो आहे का? माझी रसिकता, कलासक्ती, आवड, निवड कुठे गेली. या धोपट मार्गात तर मी हरवलो नाही ना? अश्या विचारात त्याचं डोकं भड्भडून जात असतं. हलकीशी शिरशिरी यायला सुरुवात झालेली असते.

दमलेल्या मनाने येता येता भेंडी, वांगं, दुधी भोपळा अशी भाजी विकत घेतो. आता चालता चालता त्याल घर दिसतं. थकलेल्या शरीराने तो बेल वाजवतो. आत आल्या आल्या चिमुकले हात त्याचे स्वागत करतात. "बाबा, आज माहितीये शाळेत काय झालं?" - तो चिमुरडा आवाज उत्साहाने सांगू लागतो. त्याची कळी खुलायला लागते.

"ओजसा, बाबा इतका दमून आलाय ना, त्याला नीट बसून तर दे की आधी"; ओजसाची आई चहाचा कप त्याच्या हाती देत मुलीला दटावते. अचानक त्याला मळभ दूर सारलं जातंय अशी जाणीव होउ लागते त्यामुळे त्याला अंगात बरंच बळ आल्यासारखं वाटत.  तो आवरतो, जेवून घेतो, बसल्या बसल्या त्याला कधीतरी डुलकी लागली असते.

"किती दमतोस रे आमच्या सगळ्यांसाठी!" - त्याच्या केसातून आपले थरथरणारे हात फिरवता फिरवता त्याची आई म्हणते.

तो झोपेतून हलकाच जागा होतो आणि दुसर्‍या दिवसाची तयारी करू लागतो आणि काही वेळातच समाधाने पलंगावर निद्राधीन होतो.       

Comments

Anonymous said…
वा मित्रा, मस्तच लिहिले आहे.
Rewati said…
Sundar lihilays.... exactly what happens..
Prachi said…
मस्त... माझीच स्टोरी वाटली अर्ध्यापर्यंत.....
Anonymous said…
Hatash manasthitoon baaher chhan aanlas bagh.

Fan hoto ahe tumcha mi.
Unknown said…
Anaamik 1 - Dhanywaad anamikaa

Vaishali - Dhans

Rewati - Thanks, halli kami gharat hota pan asa bahutek.

NiVy - Dhans

Prachi - ardhyaparyant mhanaje?

pudhchee goshta wegalee asate ka tuzya kade?

anaamik 2 - Manapaasoon dhanywad, khoop mothi compliment dilyaa baddal.
सुंदर लिहिलेयस ... :)
भेंडी, वांगी, दुधी भोपळा - एकदम मजेदार वाटतं. :D

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च