Skip to main content

हुरहुरण्याचे खेळ

ऑफिस सुटले की घरी जाण्याच्या रस्त्यात मोजून ७ व्या मिनिटाला ती हमखास दिसायचीच. तिच्याशी नजरानजर झाली की बास! काळीज एक ठोका चुकवायचं. या चुकणार्या ठोक्याचे अडीक्शनच  बसले होते म्हणा ना. संध्याकाळ झाली की तिच्या एका नजरे पायी जीव कासावीस व्हायचा. ती सुद्धा काही कमी नव्हती, अगदी डोळ्यात डोळे घालून बघायची, अशी खात्री व्हायची की 'आग दोनो बाजू बराबर लगी हुई है!' तिचे हलके काजळ लावलेले डोळे माझ्या हृदयाचा घोट घ्यायला बघायचे. तिचे ते भुरभुरणारे केस, तिच्या चमकदार आणि गोऱ्यापान कांतीला जास्तीच उजळून टाकायचे. तिचे ओठ तर विचारू नका - आय हाय! खरं विचाराल तर माझा अख्खा दिवस तिच्यामुळेच चालायचा. तिथे गेलं की ती तिच्या नजरेतून विचारपूस करतीये असं जाणवायचं. कधी एकदा कचेरीतली कामं आटपून तिच्याशी नजरानजर करायला जातो असे व्हायचे. 

असाच त्या दिवशी लगबगीने ऑफिसातल्या मित्रांना बाय करून निघालो. माहित नाही का पण दिवसभर तिनी हुरहूर लावली होती. काहीतरी वाईट घडणार असं वाटत होतं. धाकधूक अचानक खूप वाढली होती. कधी एकदा तिला पाहतो असं झालं होतं. चेहऱ्यावरची रेघ न हलवता आणि काही झालंच नाही अश्या अविर्भावात मी माझ्या दुचाकीकडे कूच केले. लवकरात लवकर किक मारून गाडीचा कर्णा पिरगाळला आणि गाडी झेपावली.

मोजून पाचव्या वळणावर उजव्या बाजूला ती दिसायची. आज ७ मिनिटे म्हणजे ७ युग गेल्यासारखी वाटत होती. गाड्यांच्या गर्दीत मी माझी गाडी पुढे रेटत निघालो. पाचवं वळण आलं, आणि माझ्या पायातली ताकदच निघून गेली. मी विश्वात हरवलेल्या वेड्या माणसासारखा इकडे तिकडे बघू लागलो. ती कुठेच दिसत नव्हती. माझा जीव घाबराघुबरा झाला, घसा कोरडा पडला, हात पाय थरथरायला लागले. मागून एक चारचाकीवाला मोठमोठ्याने त्याचा हॉर्न वाजवत होता, पण माझे कानच काही क्षण बधीर झाले होते. मला ती कुठेच दिसत नव्हती. एकदम शुद्धीवर आल्यासारखा झालो. आजूबाजूच्या परिस्थितीची तेव्हा कुठे जाणीव झाली.   गाडी रस्त्याच्या कडेला नेली - तिथे एक छोटेखानी जनरल स्टोअर्स होते. थोडे पाणी घेतले.

जरासं बरं वाटायला लागल्यावर पूर्ण धीर एकवटून, आणि काकूळत्या चेहऱ्याने दुकानदाराला प्रश्न विचारला,

"रस्त्याच्या पलीकडच्या बिल्डींगवरचे कतरिना कैफचे मॅंगो स्लाइस्च्या 'आमसुत्र'  जाहिरातीचे पोस्टर कधी काढले हो?"

:-D

Comments

Nivedita Raj said…
lay bhari ! agadi hurhur lagali jeevala :)
BinaryBandya™ said…
पोपट केला आमचा राव ...
चांगला झालाय लेख ...
MAST POPAT JHALA.........AAMCHA KITI KALAJI PURVAK VACHAT HOTO.......
Unknown said…
He he he! Thank you all!

Nivy - Tula pan laglee ka hurhur? hehe
Bandya - welcome aboard & thanks!
Amar, Prachi, Thank you!

Twist in the tail!
Yogesh said…
अरे रे.....एम टीवी बकरा झाला की... :) :)

मस्त लिहला आहेस.
मजा आली रे वाचताना...

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च