Skip to main content

छोटम् वयम् गम्मतम्!


सानिकाचा आठवा वाढदिवस या रविवारी येत होता. भेटवस्तू मिळणार, लाड होणार याचा सगळा विचार करून सानिकाला काय करू आणि काय नको असं झालं होता. सानिकाची आई आता यशस्वी स्त्री असली तरी मध्यमवर्गीय घरातीलच होती. तिने ती लहान असताना केक वगैरे कापून वाढदिवस नव्हता साजरा केला, पण म्हणूनच असेल तिने सानिकाचे कमी लाड केले नव्हते.
ऑफिस मधून आल्यावर जेवण बनवताना सानिकाच्या आईने सानिकाचा पापा घेतला आणि लाडातच विचारले,
"एका मुलीचं काय आहे, या रविवारी!" सानिकाला पुन्हा एकदा वाढदिवसाची आठवण झाली आणि चेहरा गुलाबाच्या कळीसारखा खुलला."
"ए सानिका, सांग ना काय काय करायचं आपण तुझ्या वाढदिवसाला?" - आईने लाड सुरु ठेवले.
"सानिका, तुला अंगूर मलई आवडते ना, मग आपण अंगूर मलई, पुरी आणि पुलाव ठेवू,

रिटर्न गिफ्ट म्हणून मुलांना छोटी छोटी झाडं देवू." - सानिकाची आई हळूहळू सानिकापेक्षा स्वत:मध्येच रमायला लागली होती आणि रविवारचे आराखडे तयार करत होती.
"तुला काय हवंय गिफ्ट म्हणून?" - शक्यतो हा प्रश्न आठ वर्षाच्या मुलांना ना विचारलेलाच बरं असतो, हे तिची आई विसरली होती, पण सानिका सुद्धा एवढा विचार करतीये पाहून तिचाही कुतूहल ताणल गेलं. लगेचच तिने स्वयंपाकाची तयारीही सुरु करायला घेतली.
सानिकानी मिनिटभर विचार करून काहीतरी आठवल्या सारखा चेहरा केला, आणि पळत पळत हाक मारली "आsssssई!"
"काय ग शोना?" - आईनेही सानिकाला लाडातल्या नावानी हाक मारली. आज माय लेकीचे प्रेम भलतेच उतू चालले होते.
"मला आठवलं, मला काय गिफ्ट हवंय ते!" - सानिका
"काय हवंय तुला?" - आईने कुतूहलाने विचारले.
"बिग बॉस मध्ये त्या पॅमेला ताईनी जशी चादर घातली होती, तश्या २-३ चादरी दे ना मला वाढदिवसाला."
इतका वेळ कौतुकानी पाहत असलेली सानिकाची आई हादरलीच! आपल्या कार्टीला, चादर घालून पॅमेला अंडरसन बनून धक धक करायचंय याचा विचार करून तिला जरा गरगरलंच आणि तिचा चेहरा सरस्वतीमाते पासून कालीमातेसारखा अवघ्या चार सेकंदात झाला.
धप्पदिशी एका धपाट्याचा आवाज आला आणि त्या मागोमाग सानिकाच्या भोकाडाचाही.

Comments

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च...

बालगंधर्व

  नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल. नितिन देसाईक्रुत ’ बालगंधर्व ’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्व ांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो. त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगं धर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्व ांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जाग...