Skip to main content

महादेव काशीनाथ गोखले

प्रस्तावना
प्रस्तुत लेख हा 'महाराष्ट्र टाईम्स' वर १७ नव्हेंबर रोजी इंटरनेट वर प्रसिद्ध झाला. माणसात रमणाऱ्या आणि माणसं शोधणाऱ्या सुधीर गाडगीळ यांच्या मिश्कील शैली मध्येच हे लेखन आहे.  दोघांचाही  मन:पूर्वक  मान राखून येथे संदर्भ देत आहे.गोखले आजोबांच्या मृतात्म्याला ईश्वर शांती देवो हीच माझी मनोकामना आहे. त्यांच्या कडून कळत-नकळत झालेल्या स्वास्थ्य आणि आरोग्याच्या प्रचाराबद्दल मी मूषकाच्या वाट्याची का होईना कृतज्ञता व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे. एवढ्याच प्रामाणिक उद्देशातून . . .  

शाळेत असताना 'ठकठक', 'चांदोबा', भा.रा.भागवत, आणि तत्सम पाक्षिके, मासिके, साप्ताहिके इत्यादी मराठी बाल साहित्य विकत घेण्यासाठी आम्ही मुले यांच्या दुकानात जात असू. पूर्वी पेरूगेट पोलीस चौकी ते भरत नाट्य मंदिर या छोट्या रस्त्याच्या मध्यभागी एक जुनी सागवानी लाकडाची चौकट असलेलं, शहाबादी फरशी चा ओटा वजा पार एवढी साधारण उंची असलेलं दुकान होतं. त्या  चौकटीजवळ इंग्रजी, मराठी, दैनिकांची शिस्तबद्धपणे मांडणी करून त्याच्या शेजारीच हे आजोबा  जमिनीवरच बसलेले दिसत. गोष्टीतले आजोबा असतात तसे मात्र हे आजोबा लाड वगैरे करताना कधीच दिसले नाहीत मात्र, मुलांची गर्दी झाली आणि, "हे पुस्तक केवढ्याला?, आणि हे?" असे सतत प्रश्न विचारणाऱ्या आणि किलबिलाट करणाऱ्या मुलांना अगदी शांतपणे किंमतही  सांगत असत. बरं आमची शाळा भावे स्कूल, म्हणजे 'बेरकी' मुलांसाठी प्रसिद्धच! क्वचित प्रसंगी त्या गर्दीत कोण मुलांच्यात मतभेद झाले, आणि त्याचे प्रत्यंतर आजोबांच्या उपस्थितीमध्ये एखाद्या शिवी बिवित झाले, की मात्र वरपक्षी म्हाताऱ्या दिसणारया या आजोबांच्या तोंडातून कडाडून आणि खणखणीत आक्षेप ऐकू यायचा. अश्या वेळेस ती मुले त्यांच्या आई वडिलांना कधी घाबरली नसतील अशी गोखले आजोबाना घाबरायची. 

                                                                         सौजन्य व साभार : महाराष्ट्र टाईम्स

हे स्वातंत्र्य सैनिक असलेले  आजोबा खूप व्यायाम करतात. ते लोणावळ्याला दर रविवारी पळत जातात, आणि मग खडकवासला -सिंहगड - खेड शिवापूर असे करत करत पुण्यात परततात;  वयाच्या  नव्वदीतही ते पर्वती चढू शकतात अश्या एक ना एक बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. हे कुठून ऐकले असावे हेही नेमके लक्षात नाही. 

ते जेव्हा उभे असायचे तेव्हा त्यांच्या पायांचे  घोटे टेकलेले असत, आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये साधारण एक लहान वीतभर एवढं अंतर असे. असलं काटक शरीर पाहून साहजिकच  विश्वास बसायचा आणि आश्चर्यही वाटायचे. जेंव्हा त्यांनी शताब्दी मध्ये पदार्पण केले होते तेव्हा सकाळ  मध्ये त्यांच्यावर एक मोठा लेख आलं होता, तेव्हाच  त्यांच्या  या  सगळ्या गोष्टींची  खात्री  झाली. एवढ सगळा वाचल्यानंतर, जाणून घेतल्या नंतर असं जाणवत आहे की एवढ्या वर्षात आजोबांनी आम्हा मुलांसमोर कधीही व्यायामाचा बडेजाव तर सोडा पण सुतोवाचही केला नाही. 

                                                                      सौजन्य व साभार : महाराष्ट्र टाईम्स

                                                                   सौजन्य व साभार : महाराष्ट्र टाईम्स
   

Comments

Popular posts from this blog

गाडी सुरु करणे : भौतिकशास्त्र :)

वाहतूकीच्या जगात तुम्ही थोडेफार सक्रीय असाल तर अशी (नाट्यमय ) अवस्था डोळ्यासमोर आणावयास अजिबात कठीण नाही. तुम्ही दुचाकी वर आहात, आणि लाल सिग्नल आहे म्हणून तुमची दुचाकी बंद करून चौकात बर्‍यापैकी पुढे थांबले आहात. तुमच्या आजूबाजूला चार पाच दुचाक्या,  पाठीमागे एक बस आणि बसच्या मागे डुकरांच्या मागे जशी  पिलावळ असते त्या पद्धतीत दहा-पंधरा दुचाक्या गर्दीत उभ्या आहेत. सिग्नलचा दिवा लालचा हिरवा होताच तुम्ही दुचाकीला किक् मारता, पण दुचाकी तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नाहीए, मग तुम्ही धडपड करायला लागता आणि तुमच्या मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवून वेळप्रसंगी तुमच्या आई वडीलांचा उद्धार करून 'कचकचून' निषेध नोंदवला जात आहे. दु:स्वप्नच ना? असा हा विचार मनात आला आणि म्हणालो गाडी का सुरू होत नाही याचं कारण बघुया. वास्तविक गाडी सुरु का होत नाही याचा विचार करण्यासाठी मुळात ती कशी सुरु होते हे समजणे  महत्वाचे आहे. त्यातूनही मुलभूत अश्या  गाडीच्या  इंजिनाचा विचार करणे जास्त समर्पक वाटते. जे काही तुटक ज्ञान आहे ते मी इकडे पाजळायचा प्रयत्न चालवणा...

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च...

बालगंधर्व

  नारायण श्रीपाद राजहंस. मराठी संस्कृतीला लाभलेली एक विभुती. ’नाट्यसंगीत’ हा प्रकार रुजवणारा, त्याचं बीज मोठं करणारे हा एक गुणी कलावंत. नाट्यसंगीतासाठी या मनुष्यानी अवघं आयुष्य वेचलं. इतकं की सध्याच्या माझ्या पिढीला मराठी संस्कृती आधी की नाट्यसंगीत आधी? असा प्रश्न पडेल. नितिन देसाईक्रुत ’ बालगंधर्व ’ चित्रपट पडद्यावर आला आणि ते हल्लीच घरोघरी पोहोचले, पण जुन्या जाणत्यांना, ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आहे, त्यांनाच खरंतर त्या चित्रपटावर भाष्य करायचा अधिकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गायकी हा बालगंधर्व ांचा गाभा आहे. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो, की बाकी सगळं जे आहे ते उत्क्रुष्टपणे दाखवले गेले असेल, त्यामुळे तो अनुभव अर्थात छान आहे. अन म्हणूनच फ़क्त माहितीपट म्हणून तो चांगला आहे. असो. त्यांचा काळ अदमासे शंभर वर्षांपूर्वीचा, पण बालगं धर्वांच्या सुरांमुळेच की काय सगळ्यांनी बालगंधर्व अजूनही मनामध्ये जपला आहे. याबद्दल पुलं म्हणाले होते की, आमच्या उमेदीच्या काळात बालगंधर्व ांचे गाणे ऐकताना आम्ही ज्या ज्या जागांवर जश्या पद्धतीनी दाद दिल्या आहेत, त्याच जाग...