Skip to main content

नवा गडी नवं राज्य

परवाच बालगंधर्वमध्ये 'नवा गाडी नवं राज्य' या नाटकाच्या (योगायोगाने) पन्नासाव्या प्रयोगाला  हजेरी  लावली. लग्न होताच पहिल्या चार - सहा महिन्यांचा गुलाबी काळ कसा संपू लागतो, नंतर 'रुटीन' सुरु होऊ लागतं अन  त्याच वेळेस संवादाअभावी काय  प्रोब्लेम्स होऊ शकतात, याचंच हे  नाटक चित्रण आहे. नाटकाची त्यातल्या त्यात जमलेली गोष्ट म्हणजे संवाद. काही काही वाक्य नकळत मनापासून दाद देवून जातात, आणि असाच अधून मधून डोकावणारा हळूवारपणा वातावरण खूपच हलक करून जातो. 

नाटकाची आंतरजालावरून मिळालेली एक जाहिरात

बाकी मी प्रिया बापट (मी शिवाजीराजे... मधली शशिकला भोसले ) चा अभिनय पहायच्या  अपेक्षेने  गेलो होतो, पण 'ठीके!' अश्याच दर्जाचा तिचा अभिनय आहे. पुण्याच्या भाषेत सांगायचं तर 'बराय'! . छाप पाडून जातो तो हेमंत ढोमे. त्याची देहबोली आणि विनोदाचं टायमिंग छान. एकच भीती आहे; भविष्यात त्याचा रंगमंचावरचा 'मकरंद अनासपुरे' अशी ओळख होऊ नये हीच. देव त्याला अजून वेगवेगळ करायची बुद्धी आणि क्षमता देवो. काही ठिकाणी उमेश कामत कमकुवत वाटतो परंतु थिएटरचा अनुभव त्याच्या देह्बोलितून दिसतो हे प्लस.

सध्याची तरुण पिढी इतकी बिनडोक आहे का आणि जर दहा पैकी दोन लोक बिनडोक असतीलही तर नाटकभर फक्त त्यांच्यासाठी म्हणून वाईट वाटत राहण्यासाठी आपण हे नाटक बघत आहोत का असं मला बर्याचदा वाटलं. दिग्दर्शक, लेखकानी गंडवायचा प्रयत्न केला आहे, असं त्यामुळे नाकारणपणे वाटत राहण्याची शक्यताही आहे.  इथून तिथून काही का होवो शेवट गोड होणारे हेही माहित असतं, त्यामुळे तेव्हा आपण कुठे आश्चर्यचकीत वगैरे नाही होत. मुळात मी स्वत: तरुण आहे आणि नाटकामध्ये दाखवलेले समज गैरसमज हे मलाच बालीश वाटले, त्यामुळे नाही त्या विषयावर कशाला वट्वट वटवट असंही मला वाटलं असेल. शिवाय नाटकाच्या कथेमध्ये तेच ते घडत राहत.  हिम्मतराव आणि केतकी ही दोन्हि पात्र अजून जास्त केन्द्रस्थानी ठेवायला हवी होती कारण तसा त्यांचा रोल खूप कमी ठिकाणी रेलेव्हंट वाटतो. ऊमेश कामत प्रिया बापट पेक्षा ८ वर्ष वगैरे मोठा नाही वाटत. वाटला असता, तर कथेचा अजून चांगला इंपॅक्ट पडला असता.

आता एवढं असूनही हे नाटक मला 'आवरा' असं वाटलं नाही, याचं कारण या नाटकाला लाभलेली तरुणाई. लेखक, दिग्दर्शक कलाकार सगळीकडे एक युथ एक्झ्युबरन्स आहे. संवाद आजच्या तरुणाईचे आणि चकचकीत नवीन आहेत, त्यामुळे खूप ताजेतवाने वाटत राहते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाटकात दर्शवलेल्या, नायक नायिकेचे आयुष्य श्रोते स्वतःशी रीलेट करू लागतात आणि तिथेच या नाटकाचे यश आहे. बाकी ह्रषिकेश कामेरकरचे संगीत निभावून घेण्याइतपत छान वाटलं. 


डावीकडून - प्राजक्ता दातार, उमेश कामत, हेमंत ढोमे, प्रिया बापट

एकूणात, अजून जास्त ट्विस्ट आणि टर्न्स असते तर नाटक 'अजून' छान झाले असते परंतु एकदा नक्कीच बघण्यासारखं नाटक आहे. प्रथीतयश पारितोषिकांच्या स्पर्धेत या नाटकाला ८ नॉमिनेशन्स आहेत, त्यानिमित्ताने एकदंत क्रिएशन्स आणि निर्माते चंद्रकांत  लोहोकर यांसह नवा गाडी नवं राज्य च्या सगळ्या चमूला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा!           

Comments

BinaryBandya™ said…
म्हणजे कमीतकमी एकदा तरी बघू शकतो
नक्कीच पाहीन आता
>>मुळात मी स्वत: तरुण आहे :)

हम्म पाहायला हवे एकदा.....
Unknown said…
बंड्या - हो हरकत नाही. एकदा पाहण्या सारखं आहे.

अच्चीत गच्ची, गच्चीत टाकी, टाकीत मासा, माश्यांनी मारला सूर . . . हे तुला माहित असेल तर नक्की बघ. :-P
Unknown said…
इंद्रधनू - :) :)

सांगावं लागतं असं लोकांना, काय करू. :-)

हो बघ....आणि हो, वर बंड्या ला जे काही लिहिलं आहे ते तुला माहित नसेल तरीही बघ. :)
Unknown said…
Khupach sundar abhipray
Unknown said…
Hamidabai chi Kothi...pan paha...changal aaahe natak...Vikas pan aaahe tya madhe
Unknown said…
विशाल धन्यवाद

हमिदाबाइची कोठी पहायचं आहे. कधी आणि कुठे लागणार आहे हे सांगितले तर काम होईल. हर्बेरीयम चे नाटका असल्याने फक्त २५ प्रयोगच होतील असा अंदाज आहे. म्हणून सांगतो. विकास ला विचारून कळव मला.

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

जनता आणि अयोध्या

बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत. एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए . मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.    २७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर क

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च